किसान क्रांति एल्गार १ जानेवारी २०१८..राज्यव्यापी बैठक
किसान क्रांतीचा १ जानेवारी २०१८ पासुन
" एल्गार "
किसान क्रांती ने शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी देशातील पहिला १जुनचा संप यशस्वी करून दाखवला . शेतकरी सुद्धा संपावर जावू शकतो ही अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करून दाखवली . कोणत्याही राजकीय पक्षाची मदत नसताना , प्रस्थापित शेतकरी संघटना बरोबर नसताना शेतकऱ्यांच्या पोरांनी संप यशस्वी करून दाखवला .३ जून २०१७ रोजी सरकार बरोबर यशस्वी चर्चा करून संप स्थगित केला . मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून संप मागे नव्हे तर स्थगित केला होता . सरकारने किसान क्रांतीच्या कोअर कमिटी बरोबर झालेल्या चर्चे मधील मागण्यातीळ फक्त कृषिमूल्य अध्यक्ष दिला .बाकी सर्व मागण्यांना हरताळ फासून शेतकऱ्यांची घोर फसवणूक. हे सरकार फडणवीस सरकार नसून फसवनिस सरकार आहे त्यांच्या।कृतीने सिद्ध केले . आमच्यावर जहरिली टीका करणारानी काय दिवे लावले हे मागील सात महिन्यात पहिले आहे . काहींनी तर आपला टिआरपी वाढवण्यासाठी २२ दिवस किसान क्रांतिचा वापर केला . सरकार बरोबर काय चर्चा झाली यामधून शेतकऱ्यांचे काय भले होणार आहे हे शेतकऱ्यांना जाणीव पूर्वक समजू दिले नाही . नक्षल विचाराच्या माणसाला सुकानुचे नेते करून संप पुढे चालवण्याचा अयशस्वी प्रयोग केला . सरसकट कर्ज माफीच्या नादात सरकारच्या मंत्री गटाने बेमालूम पणे सुकानूच्या जेष्ठ अनुभवी नेत्यांना फसवले . आमच्या बरोबर झालेली मागणी यांना मान्य नव्हती म्हणून यांनी नव्याने केलेल्या मागणीत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले .आम्ही कोणत्याही शेतकरी नेत्यावर टीका करणार नाही कारण सरकारने सर्वांना फसवले आहे . डॉ नवलेचेच खरे मानून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले .२०१७ हे शेतकरी फसवणूक वर्ष म्हणून याच्याकडे किसान क्रांती पाहते . किसान क्रांतीच्या माध्यमातून संप करणारे सर्व शेती करणारी मुले एकत्र आली होती .राजकारणातील छक्के पंजे माहीत नसलेली व पक्ष किंवा संघटना स्थापन करून दुकानदारी करणारी नव्हती त्यामुळे सरळ सरळ वागणाऱ्या लोकांची सर्वच फसवनुक करतात .किसान क्रांतीच्या माध्यमातून जो संप झाला त्यामुळे त्याचे यश अपयश तपासले तर येथील शेतकरी शेतकऱ्यांची मुले आता आपल्या हक्काची , अधिकाराची भाषा बोलू लागले .त्यामुळे येथून पुढे कोणत्याही सरकारला राज्य करणे सोपे राहिले नाही . संपामुळे अनेक स्वार्थी संघटनांच्या शाखा तालुका पातळीवर सुरु झाल्या .
शेतकऱ्यांची कर्जमुक्ती किंवा कर्जमाफी का झाली नाही.यावर्षी कर्ज बाजारीपणामुळे १०००च्या वर शेतकऱ्यांनी आपला जीव गमावला आहे .२०१४ मध्ये दिलेले सातबारा कोरा करण्याचे आश्वासन सरकारने पाळले असते तर राज्यात युतीच्या काळात झालेल्या अडीच हाजार आत्महत्या वाचल्या असत्या . कर्ज बाजारी पणामुळे शेतकऱ्यांच्या रोज आत्महत्या होत आसताना किसान क्रांती शांत बसून पाहू शकत नाही म्हणून पुन्हा आंदोलन करण्याचा व सरकारशी दोन हात करण्याचा निर्णय घेतला आहे .१ जानेवारी २०१८ या नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी शेतकऱ्यांच्या उपस्थितीत
औरंगाबाद येथे ,पटेल लॉन, कोहिनुर हॉल येथे सकाळी 11 वाजता
"किसान क्रांति राज्यव्यापी "बेठक होणार आहे. आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे .
युवा शेतकर्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे
@जयाजीराव सुर्यवशी
समन्वय किसान क्रांति
Comments
Post a Comment