नुसत्या बातम्या काम शुन्य...




नुसत्या बातम्या काम शुन्य....

लासुरस्टेशन ता.गंगापुर मराठवाड्यातील नंबर एकची बाजार पेठ.. रोज लासुरस्टेशन येथे परिसरातील ४० गावातील तसेच कन्नड, खुल्ताबाद व वैजापुर तालुक्यातुन शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी कामानिमित्त, व्यवसायासाठी तसेच शिक्षणासाठी दररोज ये जा करत असतात.
दर रविवारी लासुरस्टेशनचा आठवडी बाजार भरतो तसेच रेल्वे मार्गामुळे बाहेरील प्रवासी रोज गावात येत जात असतात त्यामुळे लाखो-कोटीची व्यवहार रोज लासुरस्टेशन मधे होत असतात.. 
मागील काही वर्षापासुन लासुरस्टेशनची लोकसंख्यां झपट्याने वाढत आहे त्यामुळे दैनदिन समशा सुध्दा वाढत आहे. परंतु योग्य प्रशासकीय नियोजन नसल्यामुळे नागरिकांना ञास होतो तो वेगळाच, पाणी हा मुद्दा तर पिढीजात शाप आहे की काय अशी नागरीकांची धारणा झालेली दिसते.
तालुक्यात दारूबंदीची आरोळी देणार्याच्या गावात Missed call वर दारू मिळते हे Digital लासुरचे लक्षण तर नाही ना ?
गेल्या काही महीन्यापासुन परिसरात चोरी, दरोडे तसेच खुनाच्या घटनेत वाढ झाल्याचे दिसत आहे.पोलीस यंञना आपल्या परिने प्रयत्न करताना दिसत असले तरी पुरेसे संख्या बळ नसल्यामुळे त्याची सुध्दा दमझाक होते.. स्थानिक कर्तव्यदक्ष पोलीस प्रशासने दरोडा टाकण्या पुर्वी दोन घटनेत दरोडखोर पकडले तसेच अवैध दारू, गुटखा मोठ्या संख्येने पकडली आहे.. त्या बद्दल सुजान नागरीकांनी वेळोवेळी कौतुक केले आहे परंतु गेल्या काही दिवसात लासुर स्टेशन गावात झालेल्या दोन व्यापारी कुटुंबातील खुनाच्या घटने मुळे सामान्य नागरीक धास्तावलेले दिसत आहे.
त्यामुळे गावात Cctv यंञना बसवण्याची माघणी जोर धरत आहे.
काही वर्षापुर्वी ग्रामपंचायत कार्यालयला भेट देताना, कार्यालयातील Cctv यंञने सोबत गावात सुध्दा ५० Camera सोबत Cctv बसवण्याचे आश्वासन स्थानिक राजकीय नेत्याने दिले होते, त्यानुसार ग्रामपंचायतने ठराव सुध्दा मंजुर केल्याचे कळते.. मग घोषणा हवेतच विरली की काय, की निवडनुक डोळ्या समोर ठेऊन केलेला "चुनावी जुमला "तर नव्हता ना? 
असो नागरीकांनाचा मानसिक व पोलीस यंञने वरिल मानसिक ,शारीरिक ञास कमी करण्यासाठी लासुर स्टेशन गावात ५० Camera असलेली Cctv यंञना बसवणे अत्यंत आवश्यक आहे त्यानुसार "मी लासुरकर प्रतिष्ठान " तसेच सामान्य नागरीकाकडुन माघणी जोर धरत आहे.
जर ग्रामपंचायत किवा स्थानिक राजकीय मंडळीना गावातील मुख्य माघणीसाठी एकञ येता नसेल किवा निवडनुक येतील तेव्हा बघु असा विचार असेल तर लवकरच स्थानिकांना मोठा लढा उभारावा लागेल हे माञ नक्की...
या साठी सर्व पक्षीय युवक साथ देतील ही अपेक्षा... 

सोबत फोटो जोडलेले आहे.


Comments

Popular posts from this blog

सरपंच,उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्यावर होणारा अन्याय थांबवा

विकासराव भाऊ.. जनतेचे प्रश्न नाहीत का?

उत्तम कापूस निर्मिती कार्यक्रम अंतर्गत आज शेतकरी मेळावा संपन्न