नागपुर अधिवेशनात 5 दिवसात विकासरावचा एकच प्रश्न आणी तो पण... वाचा
हिवाळी अधिवेशन 2017 नागपुरला विरोधकांच्या मोठ्या गदारोहळात 12 डिसेंबर पासुन सुरू झालेले आज 18 डिसेंबर पर्यत सर्वात जास्त चर्चीला गेलेला प्रश्न शेतकरी संबंधी होते.
मग ते सत्ताधारी पक्षाचे आमदार असो किवा विरोधी आमदार असोत त्यांनी सर्वानी शेतकरी सरसगट कर्जमाफी, कृषि पंप विजबिल ,ऊसाचा दर त्याच प्रमाणे प्रत्येक आमदारानी आप आपल्या मतदार संघातील रस्ते, विद्यार्थी, शाळा अधिवाशी, महीला यांच्या संबंधी प्रश्न विधानसभा /विधान परिषद भवनात आक्रमकतेने विचारल्याचे निदर्शनात येत आहे..
औरंगाबाद जिल्हातील सतिश चव्हाण, अतुल सावे, सुभाष झांबड, संदिपान भुमरे, इम्तियाज जलील, अब्दुल सत्तार, भाऊसाहेब चिकटगावकर तसेच हर्षवर्धन जाधव या सर्वानी मतदार संघ तसेच जिल्हा व राज्यातील सर्वागिण विकासच्या दृष्टिने विधीमंडळात प्रश्न उपस्थित केल्याचे दिसले. विशेष म्हणजे काही मुद्दावर मतदार संघात ,राजकारण ,जातीयतेचे उदाहरण देणारे संदिपान भुमरे व इम्तियाज जलील यांनी जिल्हातील वाढत्या प्रदूषनाचा प्रश्न एकञ विचारून सर्वाना आश्चर्यचकित केले .
आता महत्वाचे मतदार संघात साधा रस्त्या वरील दगड जरी हातात घेतला तरी रस्ताची पार्दशक पाहणी करून सां बा मंत्री यांच्या सोबत बैठक झाल्याची बातमी येते,
एखाद्या वृद्ध म्हातारीने जुन्या कामा संबंधी विचारले तरी साहेब आस्थेने जेष्ठ नागरीकांची चौकशी करत असल्याचे सोसियल मिडीयावर पसरते..
खुल्ताबादला तालुक्यात विविध कारणाने आत्महत्या करणार्याच्या घरी साधी भेट जरी दिली तरी बातमी करणारे..
विधानसभेत महाराष्ट्रात कधी मराठवाड्यात प्रसिद्ध विधाने करून करणारे..
महाराष्ट्रात ,मतदार संघात असंतोष असताना कर्जमाफीच्या यादीत नाव नसल्याने आत्महत्या करणारा शेतकरी,
स्वतःच्या गावात परिसरात दोन हत्या, अनेक चोरीचे प्रकार, मोठा गुटक्याचा साठा सापडने, दारू बंदी असताना मिस काँल वर दारू मिळने, गरिबांना मिळणारा राषनचा अवैध साठा सापडने, पाणी मिळत नाही म्हणुन महीलांचा असंतोष, स्वच्छता होत नाही म्हणुन नगरसेवकाला उपोषन करते, शेतकरी आमरण दोन दिवस उपोषन करत असताना..
मतदार संघात गेली 8 वर्ष विकासाच्या गप्पा मारणारे सार्वजनिक ,मतदार संघातील विकासाच्या प्रश्नावर गप्प का?
विधानसभेत कोणते प्रश्न विचारायला पाहीजे होते?
आणी विचारतात तर काय.. बघा
ठाणे जिल्हातील भुमी अभिलेखाचे अधिकार अहवाल कसे गहाळ झाले ते
विकासराव, ठाणे जिल्हा मतदार संघाला लागुन तर नाही.. मतदार संघात तसा मुद्दा तर नाही ना?
मग का व कसा विचारला जातो ठाणे जिल्हातील जमीनीचा प्रश्न मतदारांनी विचार करायला हवा?
विकासाच्या गप्पा मारणारे नक्कीच आमदार विकासराव तर नाही ना?
सोबत फोटो आहेत सत्य तपासुन घ्या नंतर प्रतिक्रिया द्या...
Comments
Post a Comment