मौनधारी कृषि मंत्री बोलले बाबा...
मौनधारी कृषिमंत्री बोलले बाबा...
मुद्दा कळीचा ! बोंडअळीचा !!
बोंडअळी नुकसान भरपाईसाठी कापूस उत्पादकांनी मा.बा.सभापती संतोष जाधव तसेच शेतकरी संघर्ष कृती समीती गंगापुर तालुका यांनी वेळो वेळी केलेल््य्या अंदोलनामुळे, राज्यभर गाजलेल्या "मुद्दा कळीचा बोंडअळीचा " या घोषणे तसेच स्वतःच्या घरावर शेतकरी अंदोलन करतात म्हणुन बिचकलेले नामधारी का होईना महाराष्ट्र राज्याचे कृषिमञी यांनी शुक्रवारी (ता.२२) विधानसभेत मौन सोडले कापूस उत्पादकांना हेक्टरी ३७ हजार ५०० रुपयांची मदतीची घोषणाही कृषि मंत्री यांनी विधानसभेत केली.
अधिवेशन सुरू झाल्यापासून विरोधकांनी शेतकऱ्यांना मदतीची मागणी लावून धरली होती. सरकारने विरोधकांना मदतीबाबत आश्वस्त केले होते. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेत कृषि मंत्री यांनी धान, कापूस, फळबागा, भाजीपाला नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर केली.
बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या सेंद्रिय पद्धतीने कापूस उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना हेक्टरी ३० हजार ८०० रुपये मदत करण्यात येईल. यात राष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती निधीतून ६८००, विमा कंपनीकडून आठ हजार; तर बियाण्यांच्या कंपन्यांकडून १६ हजारांच्या मदतीचा समावेश आहे. बागायती कापूस उत्पादकांना हेक्टरी ३७ हजार ५०० रुपयांची मदत देण्यात येईल. यात राष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती निधीतून १३ हजार ५००, विमा कंपनीकडून आठ हजार तर बियाणे कंपन्यांकडून नुकसानभरपाई म्हणून १६ हजार रुपयांचा समावेश आहे. कापूस उत्पादकांनाही दोन हेक्टरपर्यंत मदत करण्यात येईल.यासंदर्भात नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्यास सुरवात झाल्याचे नमूद केले.
बोंडआळीग्रस्त शेतकऱ्यांना सरकारी मदत जाहिर,कापूस उत्पादकांना हेक्टरी 30 हजार 800 रुपये जाहिर व बागायति कापूस असल्यास 37,500 रूपये ही फसवणूक आहे,ज्या शेतकरी बांधवानी पिक विमा योजना च्या हफ्ता स्वताच्या पैशातून भरला आहे, त्यांना पिक विमा मिळाला पाहिजे व सरकारी मदत वेगळी मिळाली पाहिजे तरच शेतकऱ्यांना खरी मदत मिळेल, नाहीतर आमच्याच पैसावर आमचीच दिवाळी साजरी करण्यात आली अस होईल....
योगेश शेळके समन्वय शेतकरी संघर्ष कृती समीती गंगापुर तालुका
बोंडअळी ग्रस्त शेतकर्यांनी दाखवलेल्या एकजुटीचा तसेच ओरंगाबाद कृषि कार्यालयावर, यवतमाळ येते कृषि मंत्री यांच्या घरावर तसेच गंगापुर तालुका बंदच्या हाके मुळे सरकार हादरले होते . सरकारने केलेली मदत सद्या तरी तुटपुंजी आहे.परंतु शेतकर्यांच्या हक्कासाठी लढा सुरूच राहणार.. अपेक्षा एवढीच की पैसे मिळण्यासाठी २०१९ ची वाट पहायला लावु नये म्हणजे झाले..
संतोष जाधव मा.बा.सभापती जिल्हा परिषद ओरंगाबाद
दि ९ नौव्हेबर रोजी सर्व प्रथम शेकापने पंचनामे करण्याची मागणी केली होती त्यानुसार पंचनामे झालेही परंतु नंतर सरसगट केल्यामुळे विनाकारण शेतकर्यांचा वेळ व पैसा वाया गेला. NDRF कडे शेतकर्यांचे १२००० कोटी पडले आहेत त्यातुन मदत सरकारने करायला हवी ती पण हेक्टरी १००००० रूपये परंतु सरकारने फक्त त्यातुन हेक्टरी ६८०० दिले ,हि शेतकर्यांची फसवनुक आहे की नाही?पण असो शेतकर्याच्या पदरात काही तरी पडत आहे यांचा आनंद जास्त..
भाई गणेश सोनवणे तालुका चिटनीस शेतकरी कामगार पक्ष
मुद्दा कळीचा ! बोंडअळीचा !!
बोंडअळी नुकसान भरपाईसाठी कापूस उत्पादकांनी मा.बा.सभापती संतोष जाधव तसेच शेतकरी संघर्ष कृती समीती गंगापुर तालुका यांनी वेळो वेळी केलेल््य्या अंदोलनामुळे, राज्यभर गाजलेल्या "मुद्दा कळीचा बोंडअळीचा " या घोषणे तसेच स्वतःच्या घरावर शेतकरी अंदोलन करतात म्हणुन बिचकलेले नामधारी का होईना महाराष्ट्र राज्याचे कृषिमञी यांनी शुक्रवारी (ता.२२) विधानसभेत मौन सोडले कापूस उत्पादकांना हेक्टरी ३७ हजार ५०० रुपयांची मदतीची घोषणाही कृषि मंत्री यांनी विधानसभेत केली.
अधिवेशन सुरू झाल्यापासून विरोधकांनी शेतकऱ्यांना मदतीची मागणी लावून धरली होती. सरकारने विरोधकांना मदतीबाबत आश्वस्त केले होते. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेत कृषि मंत्री यांनी धान, कापूस, फळबागा, भाजीपाला नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर केली.
बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या सेंद्रिय पद्धतीने कापूस उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना हेक्टरी ३० हजार ८०० रुपये मदत करण्यात येईल. यात राष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती निधीतून ६८००, विमा कंपनीकडून आठ हजार; तर बियाण्यांच्या कंपन्यांकडून १६ हजारांच्या मदतीचा समावेश आहे. बागायती कापूस उत्पादकांना हेक्टरी ३७ हजार ५०० रुपयांची मदत देण्यात येईल. यात राष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती निधीतून १३ हजार ५००, विमा कंपनीकडून आठ हजार तर बियाणे कंपन्यांकडून नुकसानभरपाई म्हणून १६ हजार रुपयांचा समावेश आहे. कापूस उत्पादकांनाही दोन हेक्टरपर्यंत मदत करण्यात येईल.यासंदर्भात नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्यास सुरवात झाल्याचे नमूद केले.
बोंडआळीग्रस्त शेतकऱ्यांना सरकारी मदत जाहिर,कापूस उत्पादकांना हेक्टरी 30 हजार 800 रुपये जाहिर व बागायति कापूस असल्यास 37,500 रूपये ही फसवणूक आहे,ज्या शेतकरी बांधवानी पिक विमा योजना च्या हफ्ता स्वताच्या पैशातून भरला आहे, त्यांना पिक विमा मिळाला पाहिजे व सरकारी मदत वेगळी मिळाली पाहिजे तरच शेतकऱ्यांना खरी मदत मिळेल, नाहीतर आमच्याच पैसावर आमचीच दिवाळी साजरी करण्यात आली अस होईल....
योगेश शेळके समन्वय शेतकरी संघर्ष कृती समीती गंगापुर तालुका
बोंडअळी ग्रस्त शेतकर्यांनी दाखवलेल्या एकजुटीचा तसेच ओरंगाबाद कृषि कार्यालयावर, यवतमाळ येते कृषि मंत्री यांच्या घरावर तसेच गंगापुर तालुका बंदच्या हाके मुळे सरकार हादरले होते . सरकारने केलेली मदत सद्या तरी तुटपुंजी आहे.परंतु शेतकर्यांच्या हक्कासाठी लढा सुरूच राहणार.. अपेक्षा एवढीच की पैसे मिळण्यासाठी २०१९ ची वाट पहायला लावु नये म्हणजे झाले..
संतोष जाधव मा.बा.सभापती जिल्हा परिषद ओरंगाबाद
दि ९ नौव्हेबर रोजी सर्व प्रथम शेकापने पंचनामे करण्याची मागणी केली होती त्यानुसार पंचनामे झालेही परंतु नंतर सरसगट केल्यामुळे विनाकारण शेतकर्यांचा वेळ व पैसा वाया गेला. NDRF कडे शेतकर्यांचे १२००० कोटी पडले आहेत त्यातुन मदत सरकारने करायला हवी ती पण हेक्टरी १००००० रूपये परंतु सरकारने फक्त त्यातुन हेक्टरी ६८०० दिले ,हि शेतकर्यांची फसवनुक आहे की नाही?पण असो शेतकर्याच्या पदरात काही तरी पडत आहे यांचा आनंद जास्त..
भाई गणेश सोनवणे तालुका चिटनीस शेतकरी कामगार पक्ष
Comments
Post a Comment