Posts

Showing posts from 2018

शंभर युवा .... उद्योग नवा ....

Image
मिञांनो, दि 19 फेब्रवारी 2018 पासुन उद्योग क्रांति उद्योजक संघाच्या वतीने औरंगाबाद जिल्हातील ग्रामीण युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी    *एक गाव एक उद्योग वसाहत* उपक्रम सुरू करण्यात आला होता. या उपक्रमाला अल्प काळातच चांगला प्रतिसाद मिळाला काही गावातील युवकांचा उद्योग सुरू झाला काही ठिकानी प्रगतिपथावर आहे.  उद्योग क्रांतिच्या मार्गदर्शनखाली सुरू झालेल्या तसेच उद्योग क्रांति सोबत जोडल्या गेल्या उद्योगांच्या उत्पादनाच्या वितरणासाठी दि 1 मे 2018 पासुन औरंगाबाद जिल्ह्यासाठी   *शंभर युवा उद्योग नवा*  हा नविन उपक्रम सुरू करण्यात येते आहे.  *काय असणार उपक्रम?* औरंगाबाद जिल्हातुन मार्केटिंगची आवड असलेले अल्प भांडवलात स्वतचा व्यवसाय सुरू करण्यासाठी इच्छुक सुशिक्षित युवकांना विविध उत्पादनाची गण पातळीवर *वितरण एजन्सी* (mini moll) देण्यात येणार आहे या एजन्सी मध्ये LED Ligths,ठिबक सिंचन, ताडपञी, खेळणी, सर्व प्रकारचे मसाले, शेता उपायुक्त औषधी, शालेय स्टेशनरी साहित्य ,कोंबडी लोनचे,गुलाब जल,चिंच पावडर, कोळसा वाटर हिटर,plastic ट...

१जुन २०१८ शेतकरी संपाचे राष्ट्रीय चालक आता व्यापारी

Image
१जुन २०१८ शेतकरी संपाचे राष्ट्रीय चालक आता व्यापारी १ जुन २०१७ ऐतिहासिक संप ज्या शडयंत्रीनी संपवून टाकला तेच २०१८ च्या संपाचे स्वयम घोषीत राष्ट्रीय उपाध्यक्ष झाल्यावर संपाची sure shot स्क्रिप्ट तयारच असणार ना? शेतकरी बांधवांनो , पुलतंबा जिल्हा नाशिक येथे सर्व सामान्य शेतकर्यांनी गेली अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या अनेक मागण्या मान्य करून घेण्यासाठी स्थानिक पातळीवर संपाला सुरूवात केली होती, या संपाला विविध ठिकाणी सामान्य शेतकर्यांनी पाढींबा दिला आणी कौतुक केले पुलतंब्याच्या शेतकरी संपाची धार ओळखुन महाराष्ट्रातील काही शेतकरी कार्यकत्यांनी पुणे येथे राज्य स्तरीय बैठक घेऊन १ जुन पासुन किसान क्रातीच्या नावाने संपूर्ण महाराष्ट्रात संपाची घोषणा दिली त्या बैठकीला औरंगाबाद येथील जेष्ट शेतकरी नेते जयाजीराव सुर्यवशी, विजय काकडे तसेच अनेक कार्यकते उपस्थित होते.  १ जुन महाराष्ट्र किसान क्रातीच्या संपाची जबाबदारी विभागा नुसार वाटण्यात आली त्यात पुणे विभागात प्रामुख्याने शांताराम कुंजुर, मराठवाडा विदर्भ जयाजीराव सुर्यवशी औरंगाबाद विजय काकडे देण्यात आली त्या अनुशंघाने पहीली पञकार पर...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपोषणाला उद्योग क्रांतीचा बिन शर्थ पाठिंबा

सरपंच,उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्यावर होणारा अन्याय थांबवा

Image
माननिय मुख्यमंत्री साहेब , माननिय ग्रामविकास मंत्री महोदया, मुख्य सचिव ग्रामविकास मंञालय,  जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी  महाराष्ट्र राज्य      विषय :- सरपंच,उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्यावर होणारा अन्याय थांबवा        स.न.वि.वि.,       सरपंच म्हणजे कोण हे घटनेच्या तरतुदीनुसार गावाचा प्रथम नागरिक , अख्या गावाच्या समस्या  सोडवणारा प्रधान म्हणजे सरपंच , गावाच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी २४*७ काम निस्वार्थ काम करणारा सरपंच.  परंतु सखोल विचार केला तर सरपंच ,उपसरपंच व सदस्य यांना सरकार काय सुविधा देते ? ग्रामपंचायतचा प्रमुख असून सुद्धा  त्याच्या हाताखाली काम करणाऱ्या ग्रामसेवकला २५ ते ३० हजार , शिपाई  ५००० , ऑपरेटर ६००० ,(ऑपरेटर पुरवणाऱ्या कंपनीला कमिशन सुद्धा सरपंच,उपसरपंच व सदस्य यांच्या महिन्याच्या एकूण मानधना पेक्षा 10 पट जास्त असते)      जो सर्व गाव समितीचा अध्यक्ष असतो ,तो सगळ्यात मागे , यावर तोडगा  निघाला पाहिजे  पूर्वी गावातील श्रीमंत माणूस सरपंच असायचा म...

विकास याला म्हणतात...

Image
पिपळगाव दिवशी येथे जानकीदेवी बजाज अंतर्गत 82 लाखाच्या जलसंधारणाच्या कामाचा शुभारंभ आज दि 1 फेब्रुवारी रोजी पिपळगाव दिवशी ता.गंगापुर येथे जानकीदेवी बजाज संस्था तसेच लोकसभातुन लघु मध्यम प्रकल्पातील गाळ काढणे तसेच खोलीकरणासाठी 77 लाख रूपये मंजुर करण्यात आहे . 1 फेब्रुवारी रोजी पहील्या टप्यातील काम सुरू करण्यात आले तसेच गुजर मळा शिवारातील जुन्या कोल्हापुरी बंधार्यातील 5 लाखाचे खोलीकरण रुंदीकरणाचे काम लवकरच सुरू होणार आहे . यावेळी जानकी देवी बजाज संस्थेचे काकडे साहेब  ,सरपंच संतोष जाधव ,जलसंधारण समीती व तंटामुक्ती अध्यक्ष राधाकिशन गुजर गुरुजी, ग्रामसेवक शेख साहेब  ग्रामपंचायत सदस्य मच्छींद्र भिंगारे, योगेश वर्णे ,रतन बडोगे गणेश वावरे ,उत्तम वावरे ,संदीप वर्णे, शेतकरी कामगार पक्षाचे महेश गुजर, सुनिल वावरे, शंकर बडोगे, संदीप वर्णे, दादा बडोगे, न्यानेश्वर बडोगे, संतोष वावरे, बाळु वावरे, कृष्णा वावरे, सचिन वावरे, सतिष चंदीले, कडुबा चंदीले ,बापु शेंगुळे, गणेश गुजर यांच्या सह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  पिपळगाव दिवशी येथे जानकीदेवी संस्थे मार्फत 2013 पासुन जलसंधारण,...

धर्मा पाटीलांनी सुरू केला सरकारचा काऊनडाऊन...

Image
*स्वाभिमानी शेतकरी धर्मा पाटील* लिहीण्यास कारण की, अंगात सफेद सदरा, डोक्यावर गांधी टोपी, चेह-यावर वयोमानाने आलेल्या सुरकुत्या, बघताच क्षणी कोणाला तरी दया येईल असा निरागस शेतकरी चेहरा, पण धर्मा पाटील यांची मंत्रालयात कोणाला दया का आली नाही?  अखेर या ८० वर्षांच्या आजोबांनी जीव सोडला. स्वत:शीच एक झुंज देत होते पण अखेर आजोबा गेले पण फडणवीसांचा काऊंटडाऊन सुरु करून गेले आहेत कारण आज एका धर्मानं ही हिम्मत दाखवली आहे असे अनेक धर्मा रोज मंत्रालयाच्या खेटा मारतात. कोणा कोणाला रोखणार फडवणीस साहेब ?  एक धर्मा गेल्यावर पुढच्या रांगेत शेकडो धर्मा आहेत. फडणवीसजी मंत्रालयासारख्या वास्तूत आत्महत्या करणं हे कधीच चांगलं नसतं, पण तसं घडलं आहे. तुमच्या कारकीर्दीला लागलेला हा डाग आहे, तुमची झोप नक्कीच उडाली असेल पण हा डाग पुसता येणार नाही कारण शेतकर्यांना स्वप्न तुम्ही दाखवली होती त्यामुळे ती पूर्ण करण्याची जबाबदारीही तुमचीच आहे की नाही?  अच्छेदिनचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जनतेने  २०१४मध्ये नरेंद्र मोदींपाठोपाठ विधानसभेसाठी भाजपला भरभरून मतदान केलं. धर्मा पाटीलही त्यापैकीच एक ...

Vote For Dhairyen - MyCuteBaby Photo Contest

Vote For Dhairyen - MyCuteBaby Photo Contest : Join MyCuteBaby Photo Contest For Free and win Amazon and flipkart shopping Gift vouchers Every month, Entries Open For All,Upto 12yrs Old Kids Allowed

मुख्यमंत्रीना.. नको ते हेलीकाँप्टर

Image
मा. मुख्यमंत्री साहेब. विषय :- हेलीकाँप्टर न वापरण्या बाबत तिळ गुळ घ्या.. गोड गोडच बोला... महोदय,  वरिल विषयी विनंती करतो की मा. मुख्यमंत्री साहेब आपण ३१ आँक्टोबर २०१४ भाजपा, शिवसेना ,रिपाई ,रासप व स्वाभिमानीचे  ( तस आता स्वाभिमानी नाही पण स्वाभिमान सोबत आहे) सरकार आल्या पासुन आपण मुख्यमंत्री आहात.प्रदेश अध्यक्ष असताना स्व.गोपीनाथ मुडे, नितीन गडकरी, एकनाथ खडसे तसेच इतर जुन्या भाजपाच्या निष्ठावंतानी नांगरनी केल्या तसेच मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या करिश्माई बी-बियानेच्या जोरावर आज पर्यत भाजप वाढीचे व सरकारने विकासाची बारमाही पिके (ग्रामपंचायत, पंचायत समीती, जिल्हा परिषद, विधान परिषद) पिकवले आणी ती बाजारात (मीडिया) चांगल्या भावाने विकली. २०१४ पासुन आज पर्यत आपल्या मंत्री मंडळात साधारण २२ कँबिनेट व १६ राज्यमंत्री असे एकुण ३८ मंत्री आहेत व आपल्या कडे बरेच उर्वरीत खातीही आहेत. राज्यघटने नुसार मुख्यमंत्री हे राज्याचे प्रथम नागरीक असतात तसेच राज्यमंत्री मंडळाचे प्रमुख असतात व नागरीक हे मालक असतात. मी उत्पादन व्यवस्थापन तसेच प्रकल्प व्यवस्थापन या श्रेञा मधे अस...

कोरडा विकास.. आभ्यासु विकास

Image
कोरड्या प्रकल्पात रंगली कागदी होड्यांची स्पर्धा. शासनाच्या ऊदासीन धोरणामुळे चुकीच्या 2003 साली पुर्ण झालेल्या शिल्लेगाव प्रकल्प परीसरातील गावांची तहान भागविण्यासाठी अयशस्वी ठरला आहे. मागील सहा वर्षांपासुन हा प्रकल्प कोरडा ठाक पडला असुन या प्रकल्पात पाणी येण्यासाठी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी गंगापुर तालुका शेतकरी कृती समितीच्या वतीने दि 9 जानेवारी रोजी शिल्लेगाव मध्यम प्रकल्पात शालेय कागदी होड्यांची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती .           शिरेगाव आणी देवळी या दोन्ही गावची 905 हेक्टर जमिन संपादित करून 1300 हेक्टर लाभक्षेत्र असनारा महत्वाकांक्षी प्रकल्प शासनाने 2003 मधे पुर्ण केला मार्तंडी नदीवर बांधण्यात आलेल्या या प्रकल्पात  पावसाळ्यात 8.19 दशलक्ष घनमीटर पाणी येते तर पावसाळा संपल्यावर याच नदीवर 0.41 दशलक्ष घनमीटर पाणी येते .या प्रकल्पाची एकुन 8.60 दशलक्ष घनमीटर  पाणी  साठवण क्षमता आहे. परंतु पाण्याचे स्त्रोतच नसल्याने मागील सलग सहा वर्षांपासुन हा प्रकल्प कोरडा ठाक पडला आहे.या प्रकल्पात 10 ते 12 गावातील पाणीपुरवठा योजनेच्या विहीरी आहे.प्रकल...