धर्मा पाटीलांनी सुरू केला सरकारचा काऊनडाऊन...



*स्वाभिमानी शेतकरी धर्मा पाटील*

लिहीण्यास कारण की,

अंगात सफेद सदरा, डोक्यावर गांधी टोपी, चेह-यावर वयोमानाने आलेल्या सुरकुत्या, बघताच क्षणी कोणाला तरी दया येईल असा निरागस शेतकरी चेहरा, पण धर्मा पाटील यांची मंत्रालयात कोणाला दया का आली नाही? 
अखेर या ८० वर्षांच्या आजोबांनी जीव सोडला. स्वत:शीच एक झुंज देत होते पण अखेर आजोबा गेले पण फडणवीसांचा काऊंटडाऊन सुरु करून गेले आहेत कारण आज एका धर्मानं ही हिम्मत दाखवली आहे असे अनेक धर्मा रोज मंत्रालयाच्या खेटा मारतात. कोणा कोणाला रोखणार फडवणीस साहेब ? 
एक धर्मा गेल्यावर पुढच्या रांगेत शेकडो धर्मा आहेत. फडणवीसजी मंत्रालयासारख्या वास्तूत आत्महत्या करणं हे कधीच चांगलं नसतं, पण तसं घडलं आहे. तुमच्या कारकीर्दीला लागलेला हा डाग आहे, तुमची झोप नक्कीच उडाली असेल पण हा डाग पुसता येणार नाही कारण शेतकर्यांना स्वप्न तुम्ही दाखवली होती त्यामुळे ती पूर्ण करण्याची जबाबदारीही तुमचीच आहे की नाही? 
अच्छेदिनचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जनतेने  २०१४मध्ये नरेंद्र मोदींपाठोपाठ विधानसभेसाठी भाजपला भरभरून मतदान केलं. धर्मा पाटीलही त्यापैकीच एक असतील. स्वत:च्या आयुष्यात ८० व्या वर्षी तरी अच्छे दिन येतील असं त्यांनाही वाटलं असावं, पण त्यांना हे माहित नव्हतं की या अच्छे दिनच्या काळात आपल्यावर आत्महत्या करायाची वेळ येईल म्हणून !! पण आज धर्मा पाटील गेले, हाच दिवस पाहण्यासाठी लोकांनी कौल दिला होता का?
गेल्या १५ वर्षापासून सत्तेवर असलेल्या राष्टवादी आणि काँग्रेसच्या कारभाराला लोक त्रासले होते. त्यांच्या भ्रष्टाचाराच्या सुरस कथा वृत्तपत्रांचे मथळेच्या मथळे व्यापत होत्या.
अशात एक बेदाग, नवी उमेद असलेला तरुण आभ्यासु चेहरा मुख्यमंत्री म्हणून लाभला.विरोधात असताना देवेंद्र फडणवीस यांनी सामान्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवून झंझावात निर्माण केला होता. त्यामुळे आपला माणूस सत्तेत आल्याचं हायसं अनेकांना वाटलं. सूर्याची किरणं जशी घराघरात जावी तसंच भाजपनं महाराष्ट्राच्या घराघराला कोणता ना कोणता एक आशेचा किरण दाखवला होता. साडेतीन वर्ष उलटू गेली, सूर्याची किरणं रोज घरात येतात, पण भाजपनं दाखवलेल्या आशा आजही घरात पोहचल्या नाहीत.
गेल्या अनेक वर्षापासून राज्यात भाजपचं अस्तित्व नसताना सतरंज्या अंतरणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मनात नाराजीची भावना आहे. कारण मुळ भाजपवासी असणाऱ्या कार्यकर्त्याला जो मानसन्मान मिळायला हवा होता तोच मानसन्मान बाहेरून आलेल्या लोकांना मिळतोय.
  मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, मुस्लीम आरक्षण, टोल मुक्त महाराष्ट्र, खड्डे मुक्त महाराष्ट्र ही आजही स्वप्नच आहेत. फडणवीस साहेब, छत्रपतीं शिवाजी महाराजांचं नाव घेऊन तुम्ही सत्तेवर आलात मराठा मोर्च्याच्या धामधूमीत तुम्ही स्मारकाचं जलपूजन आटोपलं, पण पुढे काय? इंदु मिलच्या जागेत बाबासाहेबांच्या स्मारकाचं काय झालं?
एकीकडे समाजा-समाजात तेड निर्माण झाला आहे. शेतकरी वर्ग समाधानी नाही. सामान्य जनता महागाईनं त्रस्त झालीय. व्यापारी वर्ग तरनोटबंदी आणि जीएसटी नंतर तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत आहे.
त्यामुळे सामान्य जनतेला सध्या सूर्याची किरणंही नकोत आणि आशा तर त्यांनी सोडूनच दिल्यात. परिणामी जे लोक राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नावानं नाकं मुरडत होते तेच लोक आता आधीचं सरकार कितीतरी पटीनं बरं होतं, असं म्हणू लागले आहेत.
तुम्ही शेतकर्यांना विहीरी, शेततळे, गाय गोठे, हमीभाव, कर्जमाफी ही फक्त वर्तमान पञ व टिव्हीवर दिली हे धर्मा पाटील यांच्या आत्महत्ये पुन्हा एकदा सिध्द केल साहेब..


*स्वाभिमानी शेतकरी धर्मा पाटील यांना भावपूर्ण श्रध्दांजली*

@महेश गुजर
*शेतकरी कामगार पक्ष*
नविन विचार ! नविन पर्याय !!

Comments

Popular posts from this blog

सरपंच,उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्यावर होणारा अन्याय थांबवा

विकासराव भाऊ.. जनतेचे प्रश्न नाहीत का?

उत्तम कापूस निर्मिती कार्यक्रम अंतर्गत आज शेतकरी मेळावा संपन्न