मुख्यमंत्रीना.. नको ते हेलीकाँप्टर
मा. मुख्यमंत्री साहेब.
विषय :- हेलीकाँप्टर न वापरण्या बाबत
तिळ गुळ घ्या.. गोड गोडच बोला...
महोदय,
वरिल विषयी विनंती करतो की मा. मुख्यमंत्री साहेब आपण ३१ आँक्टोबर २०१४ भाजपा, शिवसेना ,रिपाई ,रासप व स्वाभिमानीचे ( तस आता स्वाभिमानी नाही पण स्वाभिमान सोबत आहे) सरकार आल्या पासुन आपण मुख्यमंत्री आहात.प्रदेश अध्यक्ष असताना स्व.गोपीनाथ मुडे, नितीन गडकरी, एकनाथ खडसे तसेच इतर जुन्या भाजपाच्या निष्ठावंतानी नांगरनी केल्या तसेच मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या करिश्माई बी-बियानेच्या जोरावर आज पर्यत भाजप वाढीचे व सरकारने विकासाची बारमाही पिके (ग्रामपंचायत, पंचायत समीती, जिल्हा परिषद, विधान परिषद) पिकवले आणी ती बाजारात (मीडिया) चांगल्या भावाने विकली.
२०१४ पासुन आज पर्यत आपल्या मंत्री मंडळात साधारण २२ कँबिनेट व १६ राज्यमंत्री असे एकुण ३८ मंत्री आहेत व आपल्या कडे बरेच उर्वरीत खातीही आहेत. राज्यघटने नुसार मुख्यमंत्री हे राज्याचे प्रथम नागरीक असतात तसेच राज्यमंत्री मंडळाचे प्रमुख असतात व नागरीक हे मालक असतात.
मी उत्पादन व्यवस्थापन तसेच प्रकल्प व्यवस्थापन या श्रेञा मधे असल्यामुळे मला management ( व्यवस्थापन) या विषयीचा थोडा फार आभ्यास असल्यामुळे सांगतो की एखाद्या कंपनी मधे मालका नंतर व्यवस्थापक हा कंपनीचा मुख्य घटक असतो आणी त्यांच्या planning नुसार कंपनीचा दैनदिन कारभार चालु असतो त्याला सहकार्य करण्यासाठी वेग वेगळ्या विभागाचे supervisor असतात व नंतर कामगार किवा कर्मचारी रोजचे उत्पादन किवा सेवा देत असतात. जो व्यवस्थापक असतो तो सर्वानुमति मते कंपनी नियमानुसार किवा उत्पादना नुसार आप आपली नियम, नियमावली तयार करत असतो आणी त्यांचे अनुकरण करणे सर्व कर्मचारियांना बंधन कारक असते.काम सुरळीत व्हावे या काही विशिष्ट योजना आखल्या जातात आणी याची पहीले काही दिवस व्यवस्थापका द्वारा देख रेख केली जाते. साधारण एखादा नविन व्यवस्थापक नियुक्त झाला की तो जुने उत्पादन पध्दत साधारण ३-४ महीन्यात समजुन घेतो तसेच उत्पादन वाढीसाठी काय करता येईल याची मांडनी करतो व त्यानुसार हवा तो कर्मचारी त्यासाठी नियुक्त करतो ,त्यास प्रशिक्षित करून योजना वापरली जाते सुरूवातीचे काही महीने यात गरजे नुसार हवे तसे बदल केले जातात तेव्हा व्यवस्थापक shop floor किवा working area यात नेहमी सहायक करत असतो.एकदा का एखादी योजना सफल झाली की त्याचे रिपोर्टस सुपरवायझर व्यवस्थापकाला दररोज देत असतो. जर कुठलाही व्यत्यय नसल्यास योजनाची पध्दत इतर विभागांना हवे तसे बदल करून कार्यान्वित करण्यात तेव्हा मालक दरमाही किवा दरवर्षी प्रगति पाहुन व्यवस्थापक व त्याचे व्यवस्थापन चांगले झालेले पाहुन कंपनीच्या भल्यासाठी नविन प्रकल्प तयार करण्यासाठी व्यवस्थापकाची मदत घेतो.परंतु जर का नविन व्यवस्थापक बदलामुळे कंपनीच्या उत्पादनात किवा उत्पन्नात प्रगति झालेली नसेल तर मालक नविन व्यवस्थापक शोधन्यास सुरूवात करतो.
असो हा भाग झाला उदाहरणाचा आता प्रगतीचा गेल्या ३.५ वर्षातील आपले सरकारी दौरे पाहता ( निवडनुक सोडुन) आज पर्यत आपण आपल्या कल्पक, आभ्यासु बुध्दीने अनेक योजना आखल्या त्या अमलात आणण्यासाठी आपण संपूर्ण महाराष्ट्रावर फिरलात सर्वानुमति आपण त्या लागु सुध्दा केल्या परंतु आपल्या खालील सुपरवायझर व कर्मचारी यांना योग्य प्रशिक्षण दिलेले दिसत नाही किवा आपल्या कडे योग्य रितीने रिपोर्टस पोहचत नाही असेच वाटत. कारण आज पर्यत महाराष्ट्रातील कोणताही मुख्यमंत्री येवढा वेळ shop floor वर किवा working area मधे दिसला नाही. हे आपल्या हेलीकाँप्टरच्या गडचीरोली, मिरा भाईदर, लातुर, नाशीक, ओरंगाबाद,अलिबाग येथील नककळत झालेल्या अपघाता वरून दिसते.. नेहमीच आपणच का भिरत राहतात? आपल्या हाता खालील मंत्री का नाही?
जेव्हा एखादा कंपनी व्यवस्थापक प्रत्येक वेळी office cabin सोडुन shop floor दिसतो तेव्हा काही तरी गरबड असते किवा योजना बरोबर नसते किवा कर्मचारी प्रशिक्षित नसतात किवा व्यवस्थापकाचा सुपरवायझर वर विश्वास नसतो असे मालक समजत असतो. एखाद्या कंपनी मधे वारंवार अपघात व कर्मचारी व कामगारांचे होता तेव्हा system fault असते .कारण shop floor वर नसलेला व्यवस्थापक तुरळक वेळीच जख्मी होतो.
आपण आमच्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व प्रथम नागरीक आहात आपल्याला कुठलेली इजा होऊ नये ,आपल्याला उंदड आयुष्य लाभो हिच जिजाऊ शिव शाहु फुले आंबेडकर चरणी प्रार्थना...
जर आपल्या दैनदिन रिपोर्टस मिळत नसतील तर सुपरवायझर बदला किवा त्यांना योग्य प्रशिक्षक देण्यात जेष्ठांची मदत घ्या. परंतु वेळ निघुन गेल्या नंतर मालकांनी नेमके काय समजायचे? व्यवस्थापक बदलायचा की नविन प्रकल्प द्याचा ?
हे मालक २०१९ लाच ठरवेल !
जय हिंद ! जय महाराष्ट्र !!
आपला सामान्य नागरीक
@महेश गुजर
Mobile क्र.८२७५५१५७९४
Comments
Post a Comment