पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपोषणाला उद्योग क्रांतीचा बिन शर्थ पाठिंबा





प्रती, 
मतदार 
भारतीय मतदार यादी

विषय :- *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपोषणाला उद्योग क्रांतीचा बिन शर्थ पाठिंबा*

मतदार महोदय.

अब की बार मोदी सरकार !
शत प्रतीशद भाजपा !
56 इंच कि छाती !
अच्छे दिन आने वाले है!

2014 लोकसभा निवडणूकी दरम्यान भारतीय जनता पक्षाने वरिल घोषणाची योग्य पद्धतीने प्रचार करत भारतीय मतदाराच्या मनात गेली 70 वर्षात जास्त काळ सत्तेवर असलेल्या काँग्रेस पक्षाचा एक हाथी पराभव करून जगातील सर्वात मोठ्या असलेल्या लोकशाहीच्या सभागृहात म्हणजेच लोकसभेत विरोधी पक्ष नेता निवडण्यासाठी लागतात तेवढे सुद्धा खासदार भारतीय मतदारांनी निवडून दिले नव्हते उलट भाजपाला स्पष्ट बहुमत दिले आणि सबका
साथ सबका विकास नारा देणारे गुजराती विकास पुरुष श्री नरेंद्र दामोदर मोदी यांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आणि लोकशाहीचे पवित्र मंदिराच्या पाहीर्याचे डोके टेकून दर्शन घेऊन लोकसभेत प्रवेश केला.जस जसे दिवस जात होते तस तसे मोदी सरकारने एक हाती निर्णय घेत होती तस तशी भाजपाची प्रगती होत गेली 24 राज्यात सत्ता, राज्यसभेच्या जास्त जागा, महानगर पालिका, नगर परिषद ,जिल्हापरिषद, पंचायत समिती, सरपंच निवडणूकीत नंबर वन, 10 कोटींवर मिस कॉल सदस्य तसेच सर्वाधिक देणगी असा स्वतंत्र्यानंतर कमी कालावधीत लोकप्रिय पक्ष बनवून सुमारे चार वर्ष सत्तेवर आल्यानंतर ही लोकप्रिय पंतप्रधान दि 12 रोजी सगळे कामे करत करत एक दिवस अचानक उपोषणाला बसणार आहेत त्याच्यावर ही वेळ कशी वे का आली हे कळाले नसताना सुद्धा फक्त आकाश वाणी वर बातमी ऐकून ऐतिहासिक उपोषणाला उद्योग क्रांती उद्योजक संघ बिना शर्थ पाठिंबा जाहीर करण्यात येत आहे.
दि 11 रोजी वर्तमान पत्रात छापून आलेल्या बातमी नुसार उपोषणाचे कारण चालू अर्थ संकल्पीय अधिवेशनात विरोधक सभाग्रहात
कामे करू देत नाहीत म्हणून सरकारला विकासामत्क निर्णय घेण्यात व्यत्यय आणतात म्हणून! आता आमचा साधारण प्रश्न असा आहे की लोकसभेत बहुमत नेमके कोणत्या पक्षाचे आहे सत्ताधारी की विरोधी? 
जर विरोध पक्षाचे असेल तर पंतप्रधान यांनी राजीनामा द्यावा आणि जर मग सत्तारूढ गटाचे आहे तर उपोषणाचे नाटके कशाला? 
अशी नाटके जर देशातील सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपा नेते करत असतील तर त्यांना सक्षम विरोधी पक्षाचे स्वागत केले पाहिजे कारण लोकशाही त्यालाच म्हणतात. . . . 
मित्रांनो, आम्ही पाढींबा दिला कारण ज्या देशाचा पंतप्रधान उपोषण करत आहे ही संधी कधी मिळेल असे वाटत नाही कारण जर असाच हा पक्ष वाढत राहीला तर एक दिवस भारतीय  नागरीक चालू देत नाही म्हणून आम्ही उपोषण करत आहोत अशा यांच्या बातम्या यायला वेळ लागणार नाही. . 
आपण भारतीय नागरिक भावनिक आहोत बावळट नाही हे सांगण्याची वेळ आली आहे असे आम्हाला वाटते .ज्यांच्याकडे  जनतेने सर्व अधिकार सोपवले  तेच आता  अधिकार देऊनही  काम करू शकत नाही , या नाकर्तेपणाचे जाहीर  भोंगळ प्रदर्शन करत आहे , काम करण्यासाठी सत्ता  दिली  यांनी या काळात अनेक विदेश वाऱ्या केल्या अनेक करारावर सह्या केल्या , भारताला स्वतन्त्र मिळाले म्हणजे नेमके काय तर एक करार झाला होता सर्व मोठे उद्योग भारत सरकारचे असतील , छोटे उद्योग व किरकोळ व्यापार विदेशी लोकांना करता येणार नाही यांनी  हे सर्व गमावलं ,मोठ्या उद्योगात विदेशी गुंतवणूक  आणली नुसती आणली नाही विदेशींना पायघड्या घातल्या स्वदेशींना कुरघोड्या घातल्या , छोट्या उद्योगांचे आरक्षण रद्द करून लघु उद्योग व किरकोळ व्यापारात हि विदेशींना मोकळीक दिली व आम्हाला कुरघोड्या घातल्या एवढे करून हि ते थांबले  नाही नोट बंदी करून  सगळे व्यापार आणि उद्योग अडचणीत आणले  व आता सगळे झाल्यावर यांच्या लक्षात आले  कि चार वर्षात खूप पाणी वाहून गेले , परिस्थिती  हाता बाहेर गेली  आणि आता विरोधक काम करून देत नाही म्हणून   यांनी उपोषण करण्याचे ठरवले पण आता यांची मागणी काय ?विरोधकांनी यांना काम करू द्यावे संसद चालू द्यावी  पण आजून काय बाकी आहे  , सगळे  मोठे निर्णय यांनी घेतले आहे  आता जनता काय करणार जनतेला यांनी एका अगदी भयाण व निर्णायक परिस्थितीत   वाऱ्यावर सोडले  इतकी भयाण परिस्थिती असतांना किमान यांनी आपली लायकी दाखवून दिली व जनतेला समर्पण केले म्हणून आम्ही यांचा  जाहीर पाठिंबा देत आहोत  आता जनतेने राजकीय पक्षाच्या हातात सत्ता न देता  सरळ जनतेतून लोकप्रतिनिधी निवडावे  राजकीय पक्षाचे चिन्ह पाहून यापुढे मतदान करू नये

धन्यवाद

जय हिंद ! जय भारत !!

*आपल्या सारखे सामान्य नागरिक*
सुरेश फुलारे संस्थापक अध्यक्ष 
महेश गुजर ग्रामीण जिल्हा अध्यक्ष 
*उद्योग क्रांती* 
9370120635,9881985703

(पाठिंबा असल्यास कृपया पुढे पाठवा)

Comments

Popular posts from this blog

सरपंच,उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्यावर होणारा अन्याय थांबवा

विकासराव भाऊ.. जनतेचे प्रश्न नाहीत का?

उत्तम कापूस निर्मिती कार्यक्रम अंतर्गत आज शेतकरी मेळावा संपन्न