Posts

Showing posts from 2017

किसान क्रांति एल्गार १ जानेवारी २०१८..राज्यव्यापी बैठक

Image
किसान क्रांतीचा १ जानेवारी २०१८ पासुन                        " एल्गार "  किसान क्रांती ने शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी देशातील पहिला १जुनचा संप यशस्वी करून दाखवला . शेतकरी सुद्धा संपावर जावू  शकतो ही अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करून दाखवली . कोणत्याही राजकीय पक्षाची मदत नसताना , प्रस्थापित शेतकरी संघटना बरोबर नसताना शेतकऱ्यांच्या पोरांनी संप यशस्वी करून दाखवला .३ जून २०१७ रोजी सरकार बरोबर यशस्वी चर्चा  करून संप स्थगित केला .  मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून संप मागे नव्हे तर स्थगित केला होता . सरकारने किसान क्रांतीच्या कोअर कमिटी बरोबर झालेल्या चर्चे मधील मागण्यातीळ फक्त  कृषिमूल्य अध्यक्ष दिला .बाकी सर्व मागण्यांना हरताळ फासून शेतकऱ्यांची घोर फसवणूक. हे सरकार फडणवीस सरकार नसून फसवनिस सरकार आहे त्यांच्या।कृतीने सिद्ध केले . आमच्यावर जहरिली टीका करणारानी काय दिवे लावले हे मागील सात महिन्यात पहिले आहे . काहींनी तर आपला टिआरपी वाढवण्यासाठी २२ दिवस किसान क्रांतिचा वापर के...

विकासराव भाऊ.. जनतेचे प्रश्न नाहीत का?

Image
भाग 2 विकासराव भाऊ ... जनतेचेे प्रश्न दिसत नाही का? अधिवेशनात मोठमोठ्या घोटाळ्यांची लक्षवेधी आणि तारांकित प्रश्न मांडणारे गंगापूर -खुलताबादचे विकासराव स्थानिक प्रश्नांकडे लक्ष कधी घालणार ?  नागपुर अधिवेशनात घडलेली सत्य घटना  गंगापुर खुल्ताबाद मतदार संघातील एका सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपी जामिन रद्द व्हावा व आरोपीला अटक करावी यासाठी मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार करण्यासाठी पीडित मुलीची आई आपल्या दोन चिमुकल्यांसह नागपुरला गेली होती.भेटीसाठी आवश्यक असलेल्या ऑनलाईन प्रक्रिया  पूर्ण केली पण आमदाराची शिफारस पञ आवश्यक होते आणि आमदारांच्या शिफारसपत्रा शिवाय मुख्यमंत्र्यांना भेटता येणार नसल्याचे सांगत पोलिसांनी या मातेला परिसरात प्रवेश नाकारला. त्यामुळे नाईलाजाने त्या मातेने  विधानभवनाबाहेरच  उपाशी -तापाशीच मिठा निम दर्गा परिसरात ठिय्या दिला.पोलिसांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र मुख्यमंत्र्यांच्या भेटल्या शिवाय जाणार नसल्याची भूमिका या मातेने घेतली. नागपूरची थंडी कडाक्याची .जवळ पैसे नाही . ऐन थंडीत उपाशी असलेल्या या मायलेकरा...

बहुजन रयतेचे... छञपती संभाजी राजे

Image
बहुजन रयतेचे ... छञपती संभाजी राजे छञपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात जातीपातीला थारा नव्हताच हे त्यांच्या काळातील काही घटनां वरून इतिहासकारांनी मांडले आहेच. परंतु छञपती संभाजीराजे तर लहान पणापासूनच गरिबांच्या झोपडीत जात ,रयतच्या घरात तर त्यांचे जाने येणे जास्त .त्यांच्या जीवनातील एक घटना अशी कि संभाजीराजे  रायगड जवळ सांसोदी  { महाड  मध्ये } शिकारीसाठी गेले असता वाघाच्या हालचाली टिपताना वाघाने पाठीमागून संभाजी राजांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असता एका तरुणाने अत्यंत चपळाईने वाघाला उभा कापला त्याचे ते शौर्य पाहून संभाजी राजांनी त्याला आपला अगदी खास केले संभाजी राजे कुठेही असो रायप्पा सोबत असणार अगदी मरणाच्या दारात सुद्धा आपला राजा बंदी आहे  म्हणून जीवाची पर्वा न करता मुघलांच्या सैन्यात घुसून संभाजी राजांच्या बाजूला असलेल्या सैन्याचे क्षणात तुकडे  पाडले .राजांच्या  अंगावर असणारे साखळदंड सोडवण्याचा प्रयत्न केला पण अफाट सैन्यापुढे एकटा वीर कमी पडला आणि इतक्या सैन्याशी दोन हात करता आपले तुकडे करून घेतले आणि रक्ताचा सडा संभाजी राजांच्या पायावर पडला .आ...

विकासाची बेरीज वजाबाकी

Image
गुजरात निवडणूक : वजाबाकी गुजरात व हिमाचल प्रदेशात भाजप जिंकली आहे. नरेंद्र मोदींनी देशात सुरू केलेल्या विकासपर्वावर लोकांनी विश्वास व्यक्त केला असल्याचे भाजप या निमित्ताने सांगत आहे. देशभर मात्र भाजपच्या विजयाची चर्चा होण्याऐवजी गुजरातमध्ये कॉंग्रेसने मारलेल्या मुसंडीची चर्चा अधिक होत आहे. मोदींच्या करिष्म्यापेक्षा राहुल गांधी, जिग्नेश मेवानी, अल्पेश ठाकूर व हार्दिक पटेलने दिलेल्या लढतीबाबत लोक अधिक बोलत आहेत. निवडणुका राज्याच्या असल्या तरी मूल्यमापन मोदींच्या केंद्रातील सरकारचे होत आहे. गुजरात व मोदी हे समीकरण पाहता ते स्वाभाविकच आहे.   कॉंग्रेसमुक्त भारत तीन वर्षापूर्वी कॉंग्रेसचा पराभव करीत नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले. भाजपने मिळविलेला हा विजय खरोखर अभूतपूर्व होता. भाजपने पुढील बहुतांश निवडणुकांमध्ये विजयाची ही घोडदौड जोरदारपणे कायम ठेवली होती. विजयाच्या पार्श्वभूमीवर ते देश ‘कॉंग्रेसमुक्त’ करण्याच्या घोषणा करू लागले होते. गुजरात निवडणुकांच्या निकालाने मात्र या घोडदौडीला जबरदस्त चपराक लगावली आहे. भाजपला या निवडणुकीत १८२ जागांपैकी १५० च्या वर जागा जिंकण्याच...

मौनधारी कृषि मंत्री बोलले बाबा...

Image
मौनधारी कृषिमंत्री बोलले बाबा... मुद्दा कळीचा ! बोंडअळीचा !! बोंडअळी नुकसान भरपाईसाठी कापूस उत्पादकांनी मा.बा.सभापती संतोष जाधव तसेच शेतकरी संघर्ष कृती समीती गंगापुर तालुका यांनी वेळो वेळी केलेल््य्या अंदोलनामुळे, राज्यभर गाजलेल्या "मुद्दा कळीचा बोंडअळीचा " या घोषणे तसेच स्वतःच्या घरावर शेतकरी अंदोलन करतात म्हणुन बिचकलेले नामधारी का होईना महाराष्ट्र राज्याचे कृषिमञी यांनी शुक्रवारी (ता.२२) विधानसभेत मौन सोडले कापूस उत्पादकांना हेक्‍टरी ३७ हजार ५०० रुपयांची मदतीची घोषणाही कृषि मंत्री यांनी विधानसभेत केली. अधिवेशन सुरू झाल्यापासून विरोधकांनी शेतकऱ्यांना मदतीची मागणी लावून धरली होती. सरकारने विरोधकांना मदतीबाबत आश्‍वस्त केले होते. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेत कृषि मंत्री यांनी धान, कापूस, फळबागा, भाजीपाला नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर केली. बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या सेंद्रिय पद्धतीने कापूस उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना हेक्‍टरी ३० हजार ८०० रुपये मदत करण्यात येईल. यात राष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती निधीतून ६८००, विमा कंपनीकडून आठ हजार; तर बियाण्यांच्या कंपन्य...

नुसत्या बातम्या काम शुन्य...

Image
नुसत्या बातम्या काम शुन्य.... लासुरस्टेशन ता.गंगापुर मराठवाड्यातील नंबर एकची बाजार पेठ.. रोज लासुरस्टेशन येथे परिसरातील ४० गावातील तसेच कन्नड, खुल्ताबाद व वैजापुर तालुक्यातुन शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी कामानिमित्त, व्यवसायासाठी तसेच शिक्षणासाठी दररोज ये जा करत असतात. दर रविवारी लासुरस्टेशनचा आठवडी बाजार भरतो तसेच रेल्वे मार्गामुळे बाहेरील प्रवासी रोज गावात येत जात असतात त्यामुळे लाखो-कोटीची व्यवहार रोज लासुरस्टेशन मधे होत असतात..  मागील काही वर्षापासुन लासुरस्टेशनची लोकसंख्यां झपट्याने वाढत आहे त्यामुळे दैनदिन समशा सुध्दा वाढत आहे. परंतु योग्य प्रशासकीय नियोजन नसल्यामुळे नागरिकांना ञास होतो तो वेगळाच, पाणी हा मुद्दा तर पिढीजात शाप आहे की काय अशी नागरीकांची धारणा झालेली दिसते. तालुक्यात दारूबंदीची आरोळी देणार्याच्या गावात Missed call वर दारू मिळते हे Digital लासुरचे लक्षण तर नाही ना ? गेल्या काही महीन्यापासुन परिसरात चोरी, दरोडे तसेच खुनाच्या घटनेत वाढ झाल्याचे दिसत आहे.पोलीस यंञना आपल्या परिने प्रयत्न करताना दिसत असले तरी पुरेसे संख्या बळ नसल्यामुळे त्याची...

खरे सोने व पाणी दिलेले पितळ

Image
मी काही काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता नाही..पण आकस बुद्धि राजकारण करणार्या नमो भाजपचा विरोधक नक्की आहे ... पण तरीही गुजरात आणि हिमाचलच्या निवडणुकीचा जो निकाल लागला, त्यानंतर आपल्याशी काही बोलावे असे वाटले. त्यासाठी हा सगळा पत्रप्रपंच... सर्वात आधी अभिनंदन... तुम्ही काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष झालात त्याबद्दल... तुम्ही गांधी घराण्याचे वारसदार आहात, त्यामुळं काँग्रेसची धुरा तुमच्या खांद्यावर आलीय, हे खरेच आहे. या पदासाठी तुमच्यापेक्षा अधिक योग्य उमेदवार तुमच्याही पक्षात असतील, हे तुम्हालाही नक्कीच ठाऊक असेल. पण तुमचे गांधी हे आडनाव आणि या नावाभोवती असलेला करिश्मा ही तुमची सर्वात मोठी जमेची बाजू आहे, हे कुणालाही विसरता येणार नाही. आपल्या देशात राजकीय घराणेशाही आहे आणि ती आनंदाने स्वीकारलीदेखील जाते, हे उघड वास्तव आहे. त्यामुळे सोनिया गांधींनंतर काँग्रेस अध्यक्षपदावर तुमचा वारसाहक्क काँग्रेसच्या यच्चयावत नेत्यांनी मान्य केला आहे. आता पुन्हा मूळ विषयाकडे वळूया... ज्या पद्धतीने तुम्ही निवडणूक निकालांना सामोरे गेलात, दोन दोन राज्यात पराभूत झाल्यानंतरही कोणताही त्रागा किंवा वाचाळपणा केला न...

हारा विकास! ! जीता गुजरात !!

Image
जितेगा भाई जितेगा भाई  विकास विकास जितेगा !! 2019 ची semi final म्हणुन गुजरात विधानसभा निकाला कडे पाहत असलेली भारतीय जनता  आज भाजपाच्या विजयावर आश्चर्यचकित झालेली दिसली . विजयी भाषनात मोदीजी म्हणाले की गुजरात की जीत विकास की जीत है! परंतु वडनगर भाजपा मुक्त झाला हे माञ ते विसरले.  आता सागा, संपूर्ण निकाल लागले भाजपा 99 व काँग्रेस 80 जागा वर विजयी झाली.. 2012 चे निकाल पाहता भाजपा 17 जागा कमी व काँग्रेस 19 जागा जास्त जिंकली मग विजय नेमका कोणाचा? चक्क15 टक्के जागा भाजपाच्या कमी होऊन सुध्दा महाराष्ट्रातील नमो रुग्न (भक्त) फटाके मिठाई वाटुन विकास जीत,जातीय वाद का पराभव मोदी शहा का जादुई करिश्मा!! अशा घोषणा देत शहरी ग्रामीण भागात उत्साह साजरा करताना दिसली का तर? अपयश कस झाकले जाईल याचा केविलवाणा प्रयत्न...व आकस बुद्धि उलट काँग्रेसने 20 % जास्त जागा जिकल्या त्याच्या 22 जागा 1000-3000 मताच्या फरकाने गेल्या व त्याही राष्ट्रवादीच्या उमेदवारामुळे ( राष्ट्रवादी कोणा सोबत होती हे यावरून कळते) राष्ट्रवादी सोबत आघाडी झाली असती तर काँग्रेसचे चिञ वेगळे असते .असो,तरी महाराष्ट्र क...

नागपुर अधिवेशनात 5 दिवसात विकासरावचा एकच प्रश्न आणी तो पण... वाचा

Image
हिवाळी अधिवेशन 2017 नागपुरला विरोधकांच्या मोठ्या गदारोहळात 12 डिसेंबर पासुन सुरू झालेले आज 18 डिसेंबर पर्यत सर्वात जास्त चर्चीला गेलेला प्रश्न शेतकरी संबंधी होते.  मग ते सत्ताधारी पक्षाचे आमदार असो किवा विरोधी आमदार असोत त्यांनी सर्वानी शेतकरी सरसगट कर्जमाफी, कृषि पंप विजबिल ,ऊसाचा दर त्याच प्रमाणे प्रत्येक आमदारानी आप आपल्या मतदार संघातील रस्ते, विद्यार्थी, शाळा अधिवाशी, महीला यांच्या संबंधी प्रश्न विधानसभा /विधान परिषद भवनात आक्रमकतेने विचारल्याचे निदर्शनात येत आहे..  औरंगाबाद जिल्हातील सतिश चव्हाण, अतुल सावे, सुभाष झांबड, संदिपान भुमरे, इम्तियाज जलील, अब्दुल सत्तार, भाऊसाहेब चिकटगावकर तसेच हर्षवर्धन जाधव या सर्वानी मतदार संघ तसेच जिल्हा व राज्यातील सर्वागिण विकासच्या दृष्टिने विधीमंडळात प्रश्न उपस्थित केल्याचे दिसले. विशेष म्हणजे काही मुद्दावर मतदार संघात ,राजकारण ,जातीयतेचे उदाहरण देणारे संदिपान भुमरे व इम्तियाज जलील यांनी जिल्हातील वाढत्या प्रदूषनाचा प्रश्न एकञ विचारून सर्वाना आश्चर्यचकित केले . आता महत्वाचे मतदार संघात साधा रस्त्या वरील दगड जरी हातात घेतला तरी ...

महाझुठा...

झूठ का शहर बसाकर.., अब सुकून के लिए.., गाँव गाँव ढूँढते हैं.., बड़े अजीब हैं विकासराव के लोग.., हाथ मे कुल्हाड़ी लिए.., छाँव ढूँढते हैं...