Posts

Showing posts from January, 2018

धर्मा पाटीलांनी सुरू केला सरकारचा काऊनडाऊन...

Image
*स्वाभिमानी शेतकरी धर्मा पाटील* लिहीण्यास कारण की, अंगात सफेद सदरा, डोक्यावर गांधी टोपी, चेह-यावर वयोमानाने आलेल्या सुरकुत्या, बघताच क्षणी कोणाला तरी दया येईल असा निरागस शेतकरी चेहरा, पण धर्मा पाटील यांची मंत्रालयात कोणाला दया का आली नाही?  अखेर या ८० वर्षांच्या आजोबांनी जीव सोडला. स्वत:शीच एक झुंज देत होते पण अखेर आजोबा गेले पण फडणवीसांचा काऊंटडाऊन सुरु करून गेले आहेत कारण आज एका धर्मानं ही हिम्मत दाखवली आहे असे अनेक धर्मा रोज मंत्रालयाच्या खेटा मारतात. कोणा कोणाला रोखणार फडवणीस साहेब ?  एक धर्मा गेल्यावर पुढच्या रांगेत शेकडो धर्मा आहेत. फडणवीसजी मंत्रालयासारख्या वास्तूत आत्महत्या करणं हे कधीच चांगलं नसतं, पण तसं घडलं आहे. तुमच्या कारकीर्दीला लागलेला हा डाग आहे, तुमची झोप नक्कीच उडाली असेल पण हा डाग पुसता येणार नाही कारण शेतकर्यांना स्वप्न तुम्ही दाखवली होती त्यामुळे ती पूर्ण करण्याची जबाबदारीही तुमचीच आहे की नाही?  अच्छेदिनचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जनतेने  २०१४मध्ये नरेंद्र मोदींपाठोपाठ विधानसभेसाठी भाजपला भरभरून मतदान केलं. धर्मा पाटीलही त्यापैकीच एक ...

Vote For Dhairyen - MyCuteBaby Photo Contest

Vote For Dhairyen - MyCuteBaby Photo Contest : Join MyCuteBaby Photo Contest For Free and win Amazon and flipkart shopping Gift vouchers Every month, Entries Open For All,Upto 12yrs Old Kids Allowed

मुख्यमंत्रीना.. नको ते हेलीकाँप्टर

Image
मा. मुख्यमंत्री साहेब. विषय :- हेलीकाँप्टर न वापरण्या बाबत तिळ गुळ घ्या.. गोड गोडच बोला... महोदय,  वरिल विषयी विनंती करतो की मा. मुख्यमंत्री साहेब आपण ३१ आँक्टोबर २०१४ भाजपा, शिवसेना ,रिपाई ,रासप व स्वाभिमानीचे  ( तस आता स्वाभिमानी नाही पण स्वाभिमान सोबत आहे) सरकार आल्या पासुन आपण मुख्यमंत्री आहात.प्रदेश अध्यक्ष असताना स्व.गोपीनाथ मुडे, नितीन गडकरी, एकनाथ खडसे तसेच इतर जुन्या भाजपाच्या निष्ठावंतानी नांगरनी केल्या तसेच मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या करिश्माई बी-बियानेच्या जोरावर आज पर्यत भाजप वाढीचे व सरकारने विकासाची बारमाही पिके (ग्रामपंचायत, पंचायत समीती, जिल्हा परिषद, विधान परिषद) पिकवले आणी ती बाजारात (मीडिया) चांगल्या भावाने विकली. २०१४ पासुन आज पर्यत आपल्या मंत्री मंडळात साधारण २२ कँबिनेट व १६ राज्यमंत्री असे एकुण ३८ मंत्री आहेत व आपल्या कडे बरेच उर्वरीत खातीही आहेत. राज्यघटने नुसार मुख्यमंत्री हे राज्याचे प्रथम नागरीक असतात तसेच राज्यमंत्री मंडळाचे प्रमुख असतात व नागरीक हे मालक असतात. मी उत्पादन व्यवस्थापन तसेच प्रकल्प व्यवस्थापन या श्रेञा मधे अस...

कोरडा विकास.. आभ्यासु विकास

Image
कोरड्या प्रकल्पात रंगली कागदी होड्यांची स्पर्धा. शासनाच्या ऊदासीन धोरणामुळे चुकीच्या 2003 साली पुर्ण झालेल्या शिल्लेगाव प्रकल्प परीसरातील गावांची तहान भागविण्यासाठी अयशस्वी ठरला आहे. मागील सहा वर्षांपासुन हा प्रकल्प कोरडा ठाक पडला असुन या प्रकल्पात पाणी येण्यासाठी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी गंगापुर तालुका शेतकरी कृती समितीच्या वतीने दि 9 जानेवारी रोजी शिल्लेगाव मध्यम प्रकल्पात शालेय कागदी होड्यांची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती .           शिरेगाव आणी देवळी या दोन्ही गावची 905 हेक्टर जमिन संपादित करून 1300 हेक्टर लाभक्षेत्र असनारा महत्वाकांक्षी प्रकल्प शासनाने 2003 मधे पुर्ण केला मार्तंडी नदीवर बांधण्यात आलेल्या या प्रकल्पात  पावसाळ्यात 8.19 दशलक्ष घनमीटर पाणी येते तर पावसाळा संपल्यावर याच नदीवर 0.41 दशलक्ष घनमीटर पाणी येते .या प्रकल्पाची एकुन 8.60 दशलक्ष घनमीटर  पाणी  साठवण क्षमता आहे. परंतु पाण्याचे स्त्रोतच नसल्याने मागील सलग सहा वर्षांपासुन हा प्रकल्प कोरडा ठाक पडला आहे.या प्रकल्पात 10 ते 12 गावातील पाणीपुरवठा योजनेच्या विहीरी आहे.प्रकल...