धर्मा पाटीलांनी सुरू केला सरकारचा काऊनडाऊन...

*स्वाभिमानी शेतकरी धर्मा पाटील* लिहीण्यास कारण की, अंगात सफेद सदरा, डोक्यावर गांधी टोपी, चेह-यावर वयोमानाने आलेल्या सुरकुत्या, बघताच क्षणी कोणाला तरी दया येईल असा निरागस शेतकरी चेहरा, पण धर्मा पाटील यांची मंत्रालयात कोणाला दया का आली नाही? अखेर या ८० वर्षांच्या आजोबांनी जीव सोडला. स्वत:शीच एक झुंज देत होते पण अखेर आजोबा गेले पण फडणवीसांचा काऊंटडाऊन सुरु करून गेले आहेत कारण आज एका धर्मानं ही हिम्मत दाखवली आहे असे अनेक धर्मा रोज मंत्रालयाच्या खेटा मारतात. कोणा कोणाला रोखणार फडवणीस साहेब ? एक धर्मा गेल्यावर पुढच्या रांगेत शेकडो धर्मा आहेत. फडणवीसजी मंत्रालयासारख्या वास्तूत आत्महत्या करणं हे कधीच चांगलं नसतं, पण तसं घडलं आहे. तुमच्या कारकीर्दीला लागलेला हा डाग आहे, तुमची झोप नक्कीच उडाली असेल पण हा डाग पुसता येणार नाही कारण शेतकर्यांना स्वप्न तुम्ही दाखवली होती त्यामुळे ती पूर्ण करण्याची जबाबदारीही तुमचीच आहे की नाही? अच्छेदिनचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जनतेने २०१४मध्ये नरेंद्र मोदींपाठोपाठ विधानसभेसाठी भाजपला भरभरून मतदान केलं. धर्मा पाटीलही त्यापैकीच एक ...